काया काया शेतामधी
घाम घाम जिरव
तव्हा उगलं उगलं
कायामधून हिरवं
येता पिकाले बहर
शेताशेतात हिरवय
कसं पिकलं रे सोनं
हिर्व्यामधून पिवयं
अशी धरीत्रीची माया
अरे तिला नाही सीमा
दुनियाचे सर्वे पोट
तिच्यामधी झाले जमा
शेतामधी भाऊराया
आला पीक गोंजारत
हात जोडीसानी केला
धरीत्रिले दंडवत
शेतामधी भाऊराया
खाले वाकला वाकला
त्यानं आपल्या कपायी
टिया मातीचा लावला
अशी भाग्यवंत माय
भाउरायाची जमीन
वाडवडीलांचं देवा
राखी ठेवा रे वतन
Really Nice poem... Good
ReplyDeleteMy fev Very nice poem
ReplyDeleteBest poem
ReplyDelete2004 ला चौथ्या वर्गात mab ही कविता होती
ReplyDeleteHo
DeleteKhup chhan poeam
ReplyDeleteआज हि कविता आठवली की जणू नकळत सोबत च्या सर्व विद्यार्थी मित्रांचा आवाज कानावर येतो ते दिवस स्पष्ट आठवतात एका तालात आणि सुरत आम्ही इयत्ता चॉथी(४) ला हि कविता खुप आवडीने म्हणायचो!!
ReplyDeleteHa mala pan athwat te divas
Deleteबालपणाची एक आठवण कवीता हा आमचा जणु एक छंदच आज ही कविता गातो आम्ही..
ReplyDeleteअप्रतिम रचना
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteखूप छान आहे हि कविता
ReplyDeleteअप्रतिम अशी, मनाला भिडणारी.. कविता.
ReplyDelete